| केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY), पहिल्या टप्प्यात ३० लाख शेतकऱ्यांना ३,२०० कोटी रुपयांची मदत थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली. यानंतर आणखी ८,००० कोटी रुपयांचा दुसरा हप्ताही दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळावी यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे, जर विमा कंपन्यांनी विहित मुदतीत नुकसानभरपाई दिली नाही, तर त्यांना १२ टक्के व्याजाचा दंड भरावा लागेल. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. |
Leave a Reply