कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२५ च्या हंगामासाठी भारताच्या खरीप पेरणीचे क्षेत्र ४% वाढीसह ९९५.६३ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. मुख्य खरीप पीक असलेल्या धानाच्या (भात) क्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली असून ३६४.८ लाख हेक्टर झाले आहे. कडधान्यांचे क्षेत्र सुमारे १०६.६८ लाख हेक्टरवर स्थिर आहे. भरडधान्यांचे क्षेत्र १७८.७३ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. तसेच तेलबियांचे क्षेत्र १७५.६१ लाख हेक्टरवर आले आहे, याचे मुख्य कारण सोयाबीन आणि भुईमूग यांच्या पेरणीतील घट आहे. कापसाचे क्षेत्र १०६.९६ लाख हेक्टर झाले आहे. ऊस ५७.३१ लाख हेक्टरवर आणि ताग ५.५४ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. भारतात खरीप पेरणी क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे, परंतु सप्टेंबरमधील हवामानाची स्थिती अंतिम उत्पादन निश्चित करण्यात आणि कापणीपूर्वी होणारे पिकांचे नुकसान टाळण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
Tag: मका लागवड
-

शेतकऱ्यांचा कल मक्याकडे अधिक
चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मका लागवडीला विशेष पसंती दिल्याने सोयाबीन आणि कापसाच्या पेरणीखालील क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. सोयाबीन आणि कापसाला किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) कमी भाव मिळाल्याने शेतकरी मक्याकडे वळले आहेत, कारण मक्याला बाजारात चांगला दर मिळत आहे. 21 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात मक्याचे क्षेत्र जवळपास 10 लाख हेक्टरने वाढून 71.21 लाख हेक्टरवर पोहोचले आहे. याउलट, सोयाबीनचे क्षेत्र 7 लाख हेक्टरने घटून 111.67 लाख हेक्टरवर आले आहे, तर कापसाचे क्षेत्रही सुमारे 3.5 लाख हेक्टरने कमी होऊन 98.55 लाख हेक्टर झाले आहे.

