मे महिन्यापासून भारताच्या खाद्यतेल आयातीत वाढ होत असून, जुलै २०२५ मध्ये आयात १५.५० लाख टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. जी चालू हंगामातील सर्वोच्च आयात आहे. या आयातीत ८.५० लाख टन पाम तेल, ४.९० लाख टन सोयाबीन तेल आणि १.९० लाख टन सूर्यफूल तेलाचा समावेश आहे. जून महिन्यात १५.३० लाख टन तेल आयात झाले होते. चालू हंगामात एकूण आयात (नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५) ९२ लाख टन झाली असली तरी, ती गेल्या वर्षीच्या १०१ लाख टनांपेक्षा कमी आहे. आयातीची अधिकृत आकडेवारी सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन (SEA) ऑगस्टच्या मध्यात जाहीर करेल.

