Our Blogs

Tag: शेतकरी

  • 🍂Battling Early Blight: A Gardener’s Guide to Prevention & Nano-Solutions! 🍅

    🍂Battling Early Blight: A Gardener’s Guide to Prevention & Nano-Solutions! 🍅

    Is your tomato plant looking a little sad with yellowing leaves at the bottom? You might be dealing with Early Blight, a common fungal foe for gardeners. Don’t worry, we’ve got the lowdown on why it happens and how to fight back, including some cutting-edge nanotech tricks! ✨

    Why Early Blight Attacks

    Early Blight is a sneaky disease caused by the fungus Alternaria solani. This fungus is a bit of a homebody—it loves to hang out on plant debris, on seeds, or even on certain weeds like black nightshade, just waiting for the right moment to strike. It typically goes for the older, lower leaves first, often showing up after your plants have started to produce their first fruits. It’s like the plant version of a surprise attack! 💥

    The Perfect Storm for Fungal Growth ⛈️

    This fungus thrives when the conditions are just right. Think of it as a party animal that only comes out when it’s:

    • Warm: The sweet spot is 75°F to 85°F (24°C to 29°C).
    • Wet & Humid: It needs moisture! Spores are spread by wind and splashing water from rain or your sprinklers. For an infection to take hold, the leaves need to stay wet for a while.
    • Dense: Crowded plants with poor air circulation create a humid microclimate that this fungus absolutely loves.

    🔬The Future is Colicab-Cu : Nano Silver & Copper to the Rescue!🛡️

    Are you ready to give your plants a high-tech shield against disease? 🛡️ Say hello to the future of plant protection: Colicab-Cu! This isn’t magic—it’s nanotechnology in action. By harnessing the power of microscopic silver and copper particles, Colicab-Cu creates a powerful defense that keeps fungal diseases like Early Blight at bay. Get ready to see your plants thrive like never before! 🚀

    • Nano Silver: These minuscule silver particles are like tiny ninjas! They attack fungal cells by disrupting their DNA, preventing them from making proteins, and damaging their cell membranes. Studies show they can dramatically stop the growth of Alternaria solani.
    • (Nano Copper): Even stronger than nano silver, copper nanoparticles are like a special forces unit! Their incredibly small size and huge surface area allow them to easily get inside fungal cells, causing massive damage and oxidative stress. This makes them highly effective at preventing early blight.

    So, while good old gardening practices like proper spacing and watering are key, these Nano-solutions offer a powerful, high-tech shield for your precious plants. Keep an eye out for these innovative products to give your garden the best protection possible! 🌱💪

  • खरीप पेरणीत ४% ने वाढ

    खरीप पेरणीत ४% ने वाढ

    देशात खरीप पिकांची पेरणी सामान्य क्षेत्राच्या ९०% पेक्षा जास्त झाली आहे. ८ ऑगस्टपर्यंत ९९५.६३ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ४% ने वाढ झाली आहे. धानाचे (भात) क्षेत्र १२.१% वाढले आहे, तर कडधान्यांमध्ये उडीद आणि मूग पिकांच्या पेरणीत वाढ झाली असली तरी, तुरीची पेरणी घटली आहे. भरडधान्यांच्या पेरणीत ४.५% वाढ झाली आहे, जी मक्याच्या पेरणीतील १०.५% वाढीमुळे दिसून येत आहे. मात्र, बाजरीच्या क्षेत्रात घट झाली आहे. सोयाबीन आणि भुईमुगाच्या दरात घसरण झाल्यामुळे तेलबियांच्या पेरणीत ३.७% घट झाली आहे. कापसाच्या लागवडीत ३.२% घट झाली. जून-जुलैमध्ये सरासरीपेक्षा ६% जास्त पाऊस झाला आहे, तथापि, सप्टेंबरमधील पावसावर पिकांचे उत्पादन अवलंबून असेल.

  • नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा

    नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा

    केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY), पहिल्या टप्प्यात ३० लाख शेतकऱ्यांना ३,२०० कोटी रुपयांची मदत थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली. यानंतर आणखी ८,००० कोटी रुपयांचा दुसरा हप्ताही दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळावी यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे, जर विमा कंपन्यांनी विहित मुदतीत नुकसानभरपाई दिली नाही, तर त्यांना १२ टक्के व्याजाचा दंड भरावा लागेल. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
  • भरड धान्यांचे पेरणी क्षेत्र

    भरड धान्यांचे पेरणी क्षेत्र

    चालू खरीप हंगामात राष्ट्रीय स्तरावर भरड धान्यांच्या श्रेणीत ज्वारी, बाजरी, नाचणी आणि इतर लहान भरड धान्यांच्या पेरणी क्षेत्रात किंचित घट झाली असली तरी, मक्याच्या क्षेत्रात सुमारे १० लाख हेक्टरची मोठी वाढ झाली आहे. भरड धान्यांचे एकूण लागवड क्षेत्रही गेल्या वर्षीच्या १६५ लाख हेक्टरवरून ८ लाख हेक्टरने वाढून १७३ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. ज्यामध्ये ज्वारीचे लागवड क्षेत्र १३.२० लाख हेक्टर, बाजरी ६१.६० लाख हेक्टर आणि नाचणीचे क्षेत्र २.८० लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. इतर भरड धान्यांचे क्षेत्रही ३.७० लाख हेक्टरवरून ३.४० लाख हेक्टरवर पोहोचले आहे. इथेनॉल निर्मिती, स्टार्च आणि पोल्ट्री उद्योगात मागणी वाढल्याने मक्याच्या पेरणी क्षेत्रात वेगाने वाढ झालेली पाहावयास मिळत आहे. 

  • देशपातळीवरील खरीप पेरणी

    देशपातळीवरील खरीप पेरणी

    देशभरात चांगल्या पावसामुळे खरीप पिकांच्या पेरणीने वेग घेतला असून, एकूण लागवडीचे क्षेत्र ९३३ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. हे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ लाख हेक्टरने वाढले आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भाताचे लागवड क्षेत्र ३१९ लाख हेक्टर, उस ५७.३० लाख हेक्टरवर पोहोचले आहे. तर भरड धान्यांमध्ये, विशेषतः मक्याच्या लागवडीत १० लाख हेक्टरची वाढ होऊन ती ९२ लाख हेक्टर झाली आहे. कडधान्य पिकांचे क्षेत्र १०१.२० लाख हेक्टर, तेलबियांचे क्षेत्र १७१ लाख हेक्टर आणि कापसाचे क्षेत्र १०५.९० लाख हेक्टरवर पोहोचले आहे. सोयाबीन, भुईमूग आणि तूर यांसारख्या महत्त्वाच्या पिकांची पेरणी अजूनही पिछाडीवर आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पेरणी सुरू राहणार असल्याने एकूण लागवड क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

  • ८५% खरीप पेरणी पूर्ण

    ८५% खरीप पेरणी पूर्ण

    देशभरात जून-जुलै महिन्यात झालेल्या ६% अतिरिक्त पावसामुळे खरीप पेरणीने जोर धरला आहे. १ ऑगस्टपर्यंत देशात ९३२.९३ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, हे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.१% जास्त आहे. यावर्षी धानाच्या लागवडीत १६.७% आणि मक्याच्या क्षेत्रात ११.७% वाढ झाली आहे. मात्र, तेलबिया आणि कापसाच्या क्षेत्रात किंचित घट झाली आहे. डाळींची पेरणी संमिश्र राहिली आहे. देशात पावसाचे असमान वितरण राहिले आहे; मध्य आणि वायव्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, तर पूर्व आणि दक्षिण भारतात कमी पाऊस झाला आहे. हवामान अनुकूल राहिल्यास पिकांचे उत्पादन स्थिर राहण्याचा अंदाज आहे.

  • राज्यातील खरीप पेरणी

    राज्यातील खरीप पेरणी

    राज्याच्या कृषी विभागाच्या माहितीनुसार, २१ जुलैपर्यंत राज्यात खरीप पिकांची पेरणी १.२०% नी कमी होऊन १२७ लाख हेक्टरवर पोहोचली, जी मागील वर्षी १२८ लाख हेक्टरवर होती. चालू खरीप हंगामात एकूण तेलबियांची पेरणी ३७ लाख ४४ हजार हेक्टरवर पोहोचली आहे. ज्यामध्ये भुईमुगाची पेरणी केवळ १ लाख ८ हजार हेक्टर, सोयाबीन ४६ लाख ७३ हजार हेक्टर, तर तिळाची पेरणी २,९९० हेक्टरवर झाली आहे. कापसाचे क्षेत्र घटून ३७ लाख ४४ हजार हेक्टरवर पोहोचले आहे. कडधान्याचे एकूण क्षेत्र १७ लाख ३३ हजार हेक्टरवर पोहोचले, जे मागील वर्षी १७ लाख ८७ हजार हेक्टर होते. ज्यामध्ये तुर ११ लाख ४४ हजार हेक्टर, मुग २ लाख १ हजार हेक्टर, उडीद ३ लाख ४२ हजार हेक्टरवर आणि इतर कडधान्यांची ४५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. भरड धान्यांची पेरणी वाढून २४ लाख ७० हजार हेक्टरवर पोहोचली, जी मागील वर्षी याच कालावधीत २१ लाख ६२ हजार हेक्टरवर झाली होती. ज्यामध्ये बाजरी ३ लाख हेक्टर आणि मक्याची १३ लाख ३५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. याशिवाय, भात रोवणी ७ लाख १९ हजार हेक्टर आणि खरीप ज्वारीची पेरणी ७६ हजार ५५२ हेक्टरवर पोहोचली आहे.